Showing posts with label society. Show all posts
Showing posts with label society. Show all posts

Monday, November 13, 2017

How to Prepare for Term End Examination

Whenever students take tension about exam there are mainly two reasons which caused the panic and worry.
There are some tips for all the students who wish to score good marks and clears exam as high achievers .
Time is very important asset for students . because the time which is available before exams is only valuable. Because if this time is not utilised well your upcoming holidays will go in panic.
Watch this video for understanding importance of time management.
For a students and archivers the target play very important role as you must know what you want to achieve in your life and the very next event is your exam .
Watch this video for determining the focus on your goals.
As your exams are divided as per the subjects and subjects includes various chapters . and even each exam is associated with question paper which includes questions from the chapters you studied (sometimes you kept for option )
So your synchronized study with question paper and syllabus is very vital for our successful achievement's.
Watch this video for Taking the desired action towards your success
4) Use of preparation leave
Preparation leave is an arrangement for your success if you use the PL effectively.
.Check your exam schedule and note down the dates of your exams and days between two consecutive exams. Mark those subject with red color for which the holiday is not available. Now you have to decide that 70% of your time and focus should be on those subjects during PL
5)Creating Schedule of PL
Last subject to be prepared first and first subject to be prepared at end of your preparation leave. Similarly you have to allocate 10% more time for difficult subject .  watch this video for effectively managing and scheduling your time
6)Task to be performed for last days preparation
*take previous year question paper
*take the syllabus of the subject
*divide all questions as per chapters and make a list of questions
* collect all study material of all the chapters
*carefully study the list of questions only so that you can understand which type of questions will be asked in your question paper
*now correlate the study material and questions and find out perfect answer.
*now its time to find out keywords of your perfect answers .
*Now prepare mind map of the derived keywords.You are now equipped with all tools for successfully completing examination .

Wednesday, October 26, 2016

मनच्या अवस्था

माणूस कधी कधी खूप अपेक्षा ठेवतो आणि त्यामध्ये स्वतहुन गुरफटत जातो ,

Tuesday, October 18, 2016

Meditation

*|| ध्यान (Meditation) ||*

*ध्यान म्हणजे काय?*

ध्यान म्हणजे सतत बडबड करणार्‍या अस्वस्थ मनाला शांत करणे !
त्यासाठी आपण श्वासापासून सुरूवात करतो !
ध्यानाची पध्दत अगदी सोपी आहे.

डोळे बंद करा व आपल्या नैसर्गिक श्वासाबरोबर रहा. ध्यान मनातील अस्वस्थ कंपने शांत करते, त्यामुळे त्यातून आत्मशक्‍ति, ऊर्जा जपली जाते, जी चांगले आरोग्य,मनःशांती व जीवनाच्या विवेक-ज्ञानाकडे नेते.

  *🔔ध्यानाचे फायदे🔔*

आध्यात्मिक स्वास्थ्य हे मुळ आहे आणि शारीरीक आरोग्य हे फळ आहे.
ध्यान हे आपल्या स्वत:च्या प्रयत्नांनी आपल्या जीवनाला दिलेले सर्वात मोठे बक्षिस आहे ! आपण आपल्या स्वत:ला खूप काही देऊ शकतो !
              
*ताबडतोब बरे होणे*
सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळज्यांमुळे होतात. सर्व मानसिक काळज्या बौध्दिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौध्दिक परिपक्वता ही आध्यात्मिक उर्जा कमी पडल्याने आणि आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याकारणाने येते. ध्यान करून आपल्याला भरपूर आध्यात्मिक उर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते, तेव्हा बुध्दीमत्ता पूर्ण विकसित होते, लवकरच सर्व मानसिक चिंता संपतात. परिणामस्वरूप सर्व शारीरिक आजार नाहीसे होतात. सर्व आजार बरे करण्याचा ध्यान हाच एक मार्ग आहे. पूर्वी केलेल्या वाईट कर्मांमुळे रोग होत असतात. दुष्कृत्यांचे निराकारण झाल्याविना रोग नाहिसे होणार नाहीत. दुष्कृत्यांचे परिमार्जन होण्यासाठी कोणत्याही औषधांचा उपयोग होणार नाही.

*🌳 स्मरणशक्ती वाढते 🌳*

ध्यानातून मिळविलेली भरपूर आध्यात्मिक उर्जा मेंदूला उत्तम प्रकारे व जास्तीत जास्त क्षमतेने कार्य करण्यास मदत करते. ध्यानाने स्मरणशक्ति जबरदस्त वाढते म्हणून सर्व विद्यार्थ्यांसाठी ध्यान नितांत आवश्यक आहे. शाळा आणि विद्यापीठ या दोन्ही पातळ्यांवर...........

*🔔 वाईट सवयी नष्ट होतात 🔔*

खूप खाणे, जास्त झोपणे, खूप बोलणे, अती विचार करणे, अती मद्यपान करणे, तंबाखू खाणे, इ. अनेक वाईट सवयी असतात. ध्यान करून मिळवलेले भरपूर विवेकज्ञान आणि आध्यात्मि्क ऊर्जा यामुळे सर्व वाईट सवयी आपोआप सुटतात.
    
*मन आनंदी होते👌👌*

कोणत्याही व्यक्तीसाठी आयुष्य हे पराभव, अपमान आणि वेदना यांनी पूर्ण भरलेले असते. तथापि आध्यात्मिक ज्ञान नि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त केलेल्या व्यक्तींचे जीवन सर्व पराभव, अपमान आणि वेदना असूनही नेहमी शांत व आनंदी असते.

     
*🍁कार्यक्षमता वाढते🍁*

भरपूर आध्यात्मिक उर्जा आणि आध्यात्मिक विवेकज्ञान यांच्या अस्तित्वाने सर्व कामे, मग ती शारीरिक असोत वा मानसिक, अधिक कार्यक्षमतेने केली जातात. थोड्या वेळात जास्त कामे पूर्ण होतात. किमान साधने वापरून कौतुकास्पद कामे केली जातात.

*🙏झोपेचे तास कमी होतात🙏*

ध्यानात मुबलक आध्यात्मिक उर्जा मिळविली जाते. त्यामानाने झोपेत फक्त काही अंश-फार कमी ऊर्जा मिळते. शरीराला मिळणारी विश्रांती आणि मनाला मिळणारी ऊर्जा यांचा विचार करता अर्ध्या तासाचे सखोल ध्यान हे सहा तासांच्या झोपेबरोबरचे असते.

        
*🍁  दर्जेदार नातेसंबंध 🍁*

आध्यात्मिक विवेक, ज्ञानाची कमतरता हेच परस्पर संबंध इतके समाधानकारक व दर्जेदार नसल्याचे एकमेव कारण आहे. आध्यात्मिक विवेकज्ञान प्राप्त झाल्याने परस्पर नातेसंबंध अतिशय दर्जेदार व पूर्ण समाधानकारक होतात.
             
*🍁  विचारशक्ती वाढते  🍁*

              
आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी विचारांमध्ये शक्तींची गरज असते. मनाच्या अस्वस्थ अवस्थेत निर्माण होणारे विचार किमान शक्तीचे असतात. त्यामुळे ते आपापल्या लक्ष्यापर्यंत पोहोचत नाहीत. तथापि मन शांत असलेल्या स्थितीत विचार मोठी शक्ति मिळवितात आणि सर्व इच्छा नाटयपूर्ण रितीने प्रत्यक्षात येतात.

*🙏🏻जीवनाचा उद्देश🙏*

आपण सर्व जन्म घेतो तो विशिष्ट हेतू ठेऊन, विशेष कामाकरीता, विशिष्ट रचना व विशिष्ट योजनेसह. हे फक्त आध्यात्मिकतेने परिपक्व झालेले लोकच समजू शकतात व त्यांच्या जीवनाचा विशिष्ट हेतू, विशेष कार्य, रचना आणि योजना जाणून घेऊ शकतात.

*🔔ध्यान का करावे?*

ध्यानामध्ये काय ताकद आहे?
सामुहिक ध्यान साधनेचे महत्व काय आहे?

जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि  नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात.

आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो.

हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर  व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम  आपल्यास  दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे.

महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे  प्रमाण ५०टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळल नाही म्हणुन त्यांनी याला "महर्षी इफेक्ट" असे नाव दिले.  ध्यानामधील ही ताकद आहे

आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.

👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

Saturday, October 1, 2016

मनाचा समतोल

एक पिढीच आम्हाला सोडून जात आहे !
वडिलधाऱ्यांची.......
कसे वेगळेच लोक
रात्री लवकर झोपणारे
सकाळी लवकर उठणारे
पहाटे फिरावयास जाणारे
पहाटे अंगण सडा पाहणारे
बागेला पाणी देणारे
देवपूजेसाठी फुले तोडणारे
ते होते कष्टाळू
सडसडीत बांध्याचे
पूजा अर्चा करणारे
पापभिरू ......
मंदिराला जाणारे
रस्त्यात सगळ्यांना बोलणारे
सुख दुखः विचारणारे
दोन हाथ जोडून डोक्यावर नेवून नमस्कार करणारे ....
मंदिरात साष्टांग दंडवत घालणारे
आरत्यामागून आरत्या म्हणणारे
पूजा झाल्याशिवाय अन्नग्रहण न करणारे !
सोबत भाजीसाठी कापडी पिशवी......
झालर लावलेली !
मिरवीत समाधान वाचवलेल्या एक दोन रुपयाचे
त्यांचे जगच कसे सण वार , पै-पाहुणे ,भाजीपाला ,
कडधान्ये ,तीर्थयात्रा ,रिती रिवाज अश्या गोष्टी भोवती फिरणारे !
सेल फोन कधीच वापरता न येणारे
जुन्या फोनचेच कौतुक करणारे
पाच पन्नास फोन च्या डायऱ्या बाळगणारे
आणि नेहमीच चूक नंबर फिरवणारे
आणि चुकून नंबर लागलेल्या नातेवाईकाला.....
तास भर बोलणारे !
दिवस भरात तीन चार वर्तमानपत्रे वाचणारे
विको वज्रदंती आणि मंजन वापरणारे
अंगाला नेहमी बाम चा वास
नेहमीच एकादश्या अन व्रत वैकल्ये
देवावर अन चांगुलपणावर प्रचंड विश्वास ठेवणारे
कस आखुन दिल्यासारखी काटेकोर आयुष्य जगणारे
समाजाची भीती बाळगणारे
सायकल चालवणारे
जुन्या चपला खिळे ठोकून वर्षानु वर्षे वापरणारे
सदरा आखूड होईल म्हणून लांब शिवणारे
सणावाराला अत्तर लावणारे
डिंकाचे लाडू खाणारे
उन्हाळ्यात लोणचे घालणारे
द्रुष्ट काढणारे
अन भाजीवाल्याशी भावावरून हुज्जत घालणारे
पानपुडा बाळगून पान लावून खाणारे
वर्षातून मोजकेच सिनेमे पाहणारे
हे सगळे लोक हळू हळू
सोडून जात आहेत
आणि जाणारही आहेत
त्यांच्यासोबत जाणार एक महत्वाची गोष्ट
ती म्हणजे “समाधानी आयुष्य ’’ !

Tuesday, September 27, 2016

मानवी मनाचे उत्कट प्रेम

भावनिक अस्थिरतेचा मानवी मनावर पडणारा प्रभाव हा चिरकाल टिकणारा असतो . आयुष्यात आलेले अनुभव व माणसाच्या बदलत्या अपेक्षा यांच्या संयोगाने उत्कट प्रेमाची सुरुवात होते . तसे नित्सिम प्रेम हे माता बालकाच्या रूपात सदोदित फुलत असते परंतु उत्कट प्रेमाच्या सद्य्ना या भिन्न आहेत . जणू एक सुगँधाच्या शोधत मग्न झालेला भुंगा हा कमलाकडे आक्रुश्ट होतो त्याच्यात आपल्याला उत्कट प्रेमाचा रस अनुभवास मिळू शकतो .
मनाला धुंद करणारे व परिस्थितीचे भान हरपून केले जाणारे प्रेम किंवा सुखद क्षणांची अनुभूती ही उत्कट प्रेम दर्शवते .
मनुष्य नेहमी स्वतःला आवडणारया गोष्टी  आपल्या प्रियजनंसोबतच करत असतो . आणी मग अपेक्षानचा  प्रवास सुरू होतो ते थेट उत्कट प्रेमापर्यंत .पण यात अपेक्षा करणारा हा नेहमी उपेक्षितच राहतो कारण टाळी दोन हाताने वाजते हे तो उत्कट प्रेमाच्या आशेने विसरून गेलेला असतो .

मनुष्य भूक लागली म्हणून जसा खाण्याची तरतूद करून ठेवण्याचा प्रयत्न करतो तसच तो प्रेमाची भूक भागवण्यासाठी सतत धडपड करत असतो , वेगवेगळ्या समाजरीतीनुसार ही परम्परा कायम रहते व उत्कट प्रेमाची जणू न पुसलि जाणारी एक ठोस व्याख्या मनुष्य मनावर कोरली जाते आणि मग मनुष्य वाळवंटातील म्रुगजलाच्या शोधासारखा उत्कट प्रेमाची वाट पहात बसतो . यात वय ,सामाजिक परिस्थीती किंवा इतर कोणतेही वर्गीकरण कामत येत नाही फ़क्त मनुष्य हे एकच बिरुद उत्कट प्रेमचा शोध घेत एका ठिकाणी येऊन विसावतो व काही दिवस त्याला ते उत्कट प्रेम मिळते आणी त्याची अपेक्षा वाढण्यास प्रारम्भ होतो . नेमके याच वेळी मनुष्याच्या प्रेमवीशयी सदन्या बदलतात व तो शाश्वत सत्याच्या शोधत आपल्या उत्कट प्रेमाचा शोध करण्याचा प्रयत्न करत असतो .

Thursday, September 15, 2016

माझी ओळख

Hello 
Mr Rohan Moreshwar  Homkar 
✈from Mumbai ✈working as a lecturer in k.j. somaiya collage  Mumbai .
I am member of national safety council and life member of Indian Society for technical education .
I can successfully conduct various training program's for management related issues , 
business growth , industrial safety ,
disaster management,mentoring for students and parents on effective learning methods.
mastering selling skills,☝mastering Human skills ☝,Time management , ☠industrial safety☠ , businesses growth,©®™business branding and marketing ™®©,fire safety ,disaster management 
And other management related topics
Social media presence
YouTube :-
www.YouTube.com/c/Alwayssayiamamazing
Facebook
Www.Facebook.com/rohanhomkar
Quora
Www.quora.com/rohan-moreshwar-homkar
Reasearchgate
Www.reasearchgate.net/profile/rohan_Homkar
Slideshare
Www.slideshare.net/rohanhomkar/presentations
Linkedin
Www.LinkedIn.com/pub/rohan-homkar/1a/96/741

मानवी मनाचा मागोवा

मनुष्य समाज हा नेहमी उत्क्रांती करणारा समाज म्हणून समजला गेलेला आहे , सामाजिक परम्परेने आलेली सर्व अगतिकता तो सतत वाहत आसतो , मनाला आनंदाने खुश ठेवण्यात भावनांचा आणि अपेक्षानचा खूप मोठा भाग असतो , भावनिक अस्थिरता ही माणसाला रसातळाला  नेते.

अपेक्षा करणे हे पाप नाहीये पण आपल्या सर्व अपेक्षा पूर्ण होतील असा विश्वास ठेवणे हे पाप आहे .जणु आपल्या अपेक्षा याच कश्या अवास्तव होत्या याची प्रचिती आपल्याला ही जीवनगाथा सदोदित देत असते .

माणूस नेहमी प्रयत्न करत मोठा होत असतो , त्या प्रयत्नांत मिळालेल्या सफलतेमुळे त्यच्या विश्वासात वाढ होत जाते आणि मग त्याला वाटू लागते की आपल्याला हे मिळाले पाहिजे ते मिळाले पाहिजे आणि काही वेळाने तो असा विचार करू लागतो की माझ्या अपेक्षा या जणू माझ्या मूलभूत हक्कांची ओळख आहे . आणी मग सुरू होतो प्रवास एका न सम्पणार्या घालमेलीचा , मनाची घालमेल परिस्थिती ची घालमेल आणी माणसाची होणारी ओढाताण ,जरी हातची पाचही बोटे सारखी नसतात तरी मनुष्य स्वभावाची पायमूळ ही भिन्न अशा अपेक्षेने जखडली गेलेली आहेत , कुणाला धनाची अपेक्षा कुणाला जमिनीची अपेक्षा कुणाला दोन घास खाण्याची सोय होण्याची अपेक्षा तर कुणाला दोन मिनिट प्रेमळ गूजगोष्टींची अपेक्षा . अपेक्षा करणाऱ्याला नेहमीच असे वाटते की माझी अपेक्षा किती शुल्लक आहे आणी मी तर त्या अपेक्षेला किती पात्र आहे पण खऱ्या परिस्थितीत असणाऱ्या समस्या किंवा योजनांचा अभाव हा माणसाच्या दुःखास कारणीभूत ठरतो . आणी मग माणूस बिनभोबट पणे आपल्याच अपेक्षेला दोषी ठरवत राहतो . आणी परिस्थितीची जाणीव झाल्यावर खंत करत राहण्यापेक्षा तो शाश्वत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो .आणी मग एका महान कार्याची सुरुवात होते , मनाने घेतलेले काम व त्या कामाचा असलेला परिणाम हा त्या माणसाची ओळख बनण्याचा प्रयत्न होतो .

जर एका प्रकारे विचार केला तर अपेक्षा ही समस्या नही तर संधी आहे ,पूर्ण झाली तर आनंद आणी पूर्ण नही झाली तर एक शिकवण व नविन उमेदीची आशा .

माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या

Www.youtube.com/c/alwayssayiamamazing

मानवी मनातील बदल

मानवी मनाच्या अंतरंगात उसलणरे तरंग हे अपेक्षा आणि विश्वास या वर अवलम्बुन  असतात ,जेंव्हा माणसाला खूप काही मिळते तो त्याची साठवण करतो जणू त्या साठवणीचा सम्बन्ध हा मानवी मनाचा साचा बनवण्यात कारणी भूत असतो .बदल हा देखील मानवी मनाचा एक इंटरेस्टिंग भाग आहे .जो माणूस स्वतःहून करण्यास टाळाटाळ करतो आणि दुसऱ्याने करवा /दुसऱ्यामध्ये व्हावा  अशी खूप अपेक्षा करतो .फक्त अपेक्षा करने हे काही अयोग्य नाही परन्तु  त्या अपेक्षा करणाऱ्या मानसाकडे जेंव्हा पूर्वीचा अनुभव व सामर्थ्याची जोड़ असेल तर त्या अपेक्षा कदाचित पूर्ण होतीलही पण जर त्या अपेक्षा दुसऱ्या माणसाकडून असतील तर मात्र परिस्थिती अस्स्थीर होऊ शकते ,माणसाची मनोवृत्ती बदलण्यात काळ व अनुभव यांचा खूप मोठा सम्बन्ध आहे .

माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या

Www.youtube.com/c/alwayssayiamamazing

मानवी मनाचा शोध

माणूस म्हणून जन्मला येऊन मी काय केले हा प्रश्न आपल्याला आयुष्यात कधी ना कधी पडणारच . फरक फक्त हा की काहींना हा प्रश्न आयुष्याच्या सुरवातीला पडेल तर काहींना शेवटच्या टप्प्यात !

परंतु हा प्रश्न नुसता पडून चालत नाही तर त्याचे उत्तर शोधायला प्रयत्न करायला हवेत . प्रयत्न केल्यावर उत्तर नक्की सापडेल पण ते कदाचीत नकारार्थी देखील असू शकते . आणी याच ऊत्तराला तुम्ही कश्याप्रकारे समजून घेता हे तुमच्या मनावर व तुमच्या विचारशक्तीवर अवलम्बुन असते .

माणूस म्हणून जन्माला येऊन जर मी फक्त जनावरांसारखी  खाणे ,राहणे ,झोपणे ,व स्वतःचे संरक्षण  करून प्रजा वाढवणे हीच काम करून आयुष्य वाया घालवत असेन तर माझ्या वयाइतकी वर्षे मी वाया घालवली आहेत असे म्हणण्यास हरकत नाही .

माणूस हा एक सामाजीक प्राणी आहे असे म्हणतात परंतु माणसाने त्याचे आयुष्य समाजाच्या हितासाठी खर्चले नाही तर त्याच्या माणूसपणाचा काय उपयोग .

आपण जेंव्हा एखाद्या समस्येमुळे त्रस्त होतो व त्यां त्रासापासून मुक्त होण्याचा काही उपाय शोधून काढतो . त्याचप्रमाणे आपण समाजातील इतर माणसांच्या समस्येवर उपाय शोधून काढायला हातभार लावला पाहिजे .

आज आपण स्वतःहून स्वतःची तसेच आपल्या माणसांची ,वस्तूंची काळजी घेतो, त्याचप्रमाणे आपण समाजाच्या हितासाठी आपल्या योगदानस्वरुपी कामाची काळजी केली पाहिजे .

मानवी मनाचा विचार हा नेहमी एका खूप सरळ पध्ध्तीने होत असतो ज्या मध्ये गरज ,माध्यम ,संधी व इच्छाशक्ति यांचा समावेश होतो .

पुढील पोस्ट मध्ये आपण मनाची गरज या विषयी माहिती घेउया .

माझ्या youtube चॅनेल ला भेट द्या

Www.youtube.com/c/alwayssayiamamazing

.